जेव्हा व्यवहारवादाचे
पिशाच्च,
भेसूर हास्य करीत
बसतं सामान्याचा मानगुटीवर
अविरत चाललेल्या गोष्टी
पुन्हा डोकी वर काढू लागतात,
वाटच बघत असतात त्या
कुणाच्या मनातली भिती
जाते अमाप पराकोटीला
उधाणतो प्रेमाचा सागर
पुनवेची ददात न ठेवता
गावी नसलेल्या संकल्पना
सत्य ठरू लागतात,
अपुल्याच भावनीक परीघात
नुकतच बाळसं धरलेलं
रांगणारं पोर,
उभं राहत नाही कधीच
कारण तेव्हा
एक समर पेटतं बेभान
अपुल्याच मुल्यांचं
-शोधग्राम,
गडचिरोली
No comments:
Post a Comment