Wednesday, November 23, 2011

आता बरं वाटतय...

पेनने कागदावर खुप रेघोट्या माराव्या
आरसा फोडावा कप तोडावा
सगळ्यांना बोल-बोल बोलावं
एकांतामध्ये हंबरडा फोडावा
तोड पुसून सगळं पुर्ववत असल्याचा आव आणावा
कुठेतरी दूर एकट्यानेच फिरायला जावं


गाडीखाली जावं की पाण्यात जीव द्यावा....
.
.
.
पण मग घरच्यांचं काय होईल...?
( मी मरणाला भिलो का?)
.
.
.
हुश्श...

आता बरं वाटतय...

No comments:

Post a Comment